मतदानाचा हक्क बजावला
निवडणुकीचे निकाल लागले
तेच सरकार निवडून देऊन
जनतेचे पुन्हा बारा वाजले
निवडणुकीचे निकाल लागले
तेच सरकार निवडून देऊन
जनतेचे पुन्हा बारा वाजले
स्पष्ट मिळाले बहुमत
पण होऊ न शकले एकमत
गृहीत धरलेले लोकमत
किंवा मताची मोजलेली किंमत
सर्वा हवी होती खाती
जेथून पैसे खाता येती
हवालदिल झालेला शेतकरी
अन त्याची गहाण ठेवलेली माती
महाग झालेली साखर तुरडाळ
पाडती खिशाला मोठी भोकं
मटण मच्छी दूर राहिले
भाजीपाल्याने देखील गाठले टोकं
घरोघरी ऑफिस मध्ये
जनमाणसात आहे एकच चर्चा
सांगा राज्यकर्त्यांनो आम्ही
कशा पुऱ्या कराव्या गरजा?
स्वस्त काही राहिले असेल तर
त्या राजकारण्यांच्या शपथा
हे करू अन ते करू म्हणणारे
होती ५ वर्षांकरिता लापत्ता
मतदाराला थोडी अक्कल, थोडा वेळ
अन कळतो थोडासाच कायदा
ह्या अशाच फक्त शिकलेल्या जनतेचा
घेती अडाणी मंत्री गैरफायदा
अमुक पक्ष असो वा तमुक मंत्री
सर्वांचे एकच सर्वव्यापी धोरण
भुकेने जनता मेली तरी चालेल
पण आपल्या दारी लावू सोन्याचे तोरण
तांदळातून खडे निवडायला वेळ लागावा
त्याहूनही कमी वेळात निवडतो आपण उमेदवार
जसा खडा काढावा भातातून
तसाच उमेदवार बाद करण्याचा असावा अधिकार
करंगळी कापून ह्यांचा व्हायला हवा शपथविधी
म्हणजे राहील ह्यांना वचनांची आठवण
तरीदेखील विसर पडला ह्यांना
तर करू ताबडतोब ह्यांची घरी पाठवण
असे केल्यानेच येईल शिवबांचे राज्य
रयतेच्या दारात लागेल आनंदाची दीपमाला
आणि तुम्हा आम्हाला म्हणता येईल
खर्या अर्थाने शपथविधी झाला
jyala ase shabd suchatat to khara shabd srushticha ishwar asato
ReplyDeletekaran bhavan sagalyanach asatat pan tya shabdat gumfun tya nirgun bhavanela sagun sakar karan he tyanchya hatat asat.......
samarth mhanatat----
ata aso ha vichar | jagas adhar kaveshwar |
tayansi maza namskar | sashtangbhave ||
jay jay raghuveer samarth
Amrut Ramdasi
Sajjangad